Ayushman Bharat Yojana : आजच्या काळात जेव्हाही तुम्ही तुमच्या कुटुंबीयांच्या किंवा कोणत्याही नातेवाईकाच्या उपचारासाठी दवाखान्यात गेला असाल तेव्हा तुम्हाला कळले असेल की उपचारासाठी खूप खर्च येतो, एक-दोन दिवसांच्या उपचारासाठी लाखोंचा खर्च येतो. पण आता सरकारने दवाखान्याच्या खर्चातून लोकांना मोठा दिलासा दिला आहे. नागरिकांच्या मोफत उपचारासाठी सरकारने एक अत्यंत महत्वाची योजना सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana).